Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!

दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

Read More
Swarajyatimesnews

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

Read More
Swarajyatimesnews

‘कशापायी हट्ट केलास बाळा? लेकीला काय सांगू, मी एकटी कशी जाऊ गावाला?’ – वारीत नातू गमावलेल्या आजीच्या हुंदक्यांनी पंढरीची वाटही हेलावली!

सराटी (ता.इंदापूर) विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या पंढरपूर वारीत एका २० वर्षांच्या तरुणाचा नीरा नदीच्या पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील गोविंद कल्याण फोके असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, यंदाची त्याची पहिलीच वारी आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी पहाटे सराटीजवळ नीरा नदीत घडलेल्या या घटनेने वारी…

Read More
Swarajyatimesnews

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे  महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

Read More
Swarajyatimesnews

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त

पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…

Read More
Swarajyatimesnews

आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी १ मिनिटात ३२- ३५ वारकऱ्यांना मिळणार विठुरायाचे दर्शन

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना जलद आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत एका मिनिटात ३२ ते ३५ वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी घुसखोरीच्या ठिकाणांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. यावर्षी…

Read More
Swarajyatimesnews

राज्यातील वीज ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’; पहिल्यांदाच पाच वर्षांत दर कमी होणार!

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी होणार असून, यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या वर्षी वीज दरात १०…

Read More
Swarajyatimesnews

काळाचा घाला! आई-वडिलांविना कष्टातून आयुष्य फुलवले, पण हृदयविकाराने प्रदीप ढेरंगेंना हिरावले

कोरेगाव भीमावर शोककळा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कोरेगाव भिमा (ता. शिरूर): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाऊन, मोठ्या हिमतीने स्वतःचा संसार आणि शेती फुलवलेल्या कोरेगाव भीमा येथील मनमिळावू, कष्टकरी आणि हसतमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप ढेरंगे (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) यांचे मध्यरात्री ३ वाजता आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक बातमीने कोरेगाव भीमा आणि पंचक्रोशीवर…

Read More
Swarajyatimesnews

‘तुम्ही कुठे कलेक्टर झालात?’ – मुलीच्या उत्तराने संतापलेल्या मुख्याध्यापक बापाने पोटच्या लेकीलाच संपवले; सांगलीत धक्कादायक घटना

सांगली, (आटपाडी): बारावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला नीट (NEET) परीक्षेच्या चाचणीत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका मुख्याध्यापक बापाने जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातून समोर आली आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसले या मुख्याध्यापक पित्यास अटक करण्यात आली आहे. कमी गुणांमुळे संताप, मुलीचे ‘उलट…

Read More
Swarajyatimesnews

आता पैशांमुळे कोणाचेही शिक्षण थांबणार नाही: ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी’ योजनेद्वारे घरबसल्या मिळवा बिनव्याजी कर्ज!

योजनेमुळे घरबसल्या, कुठल्याही हमीदाराशिवाय आणि मालमत्ता गहाण न ठेवता शैक्षणिक कर्ज मिळवता येते बँकेच्या फेऱ्या नाहीत, थेट पोर्टलवर अर्ज!  चांगले शिक्षण मिळावे आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आता ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ (PM VidyaLakshmi Yojana) सुरू केली…

Read More
error: Content is protected !!