शिरूर तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा, पाबळ, कान्हूर मेसाई परिसरात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर
टँकरसाठी नागरिकांची कसरत गतवर्षी झालेला अल्प पाऊस, उन्हाच्या वाढत्या तीव्र झळा, आटलेले पाणवठे, ओढे-नाले आणि विहिरींनी गाठलेल्या तळा यामुळे शिरूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ परिसरातील गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन आणि…

