मुलगी पाहायला गेले अन् नवरी घेऊनच परतले, अनावश्यक खर्चाला फाटा देत देशमुख-कुंदे परिवाराचा आदर्श
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) आजच्या काळात लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचे मिलन न राहता, तो एक अवाढव्य आर्थिक सोहळा आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनले आहे. लाखो रुपयांची उधळण, डीजेचा कर्णकर्कश आवाज, पंचतारांकित जेवणावळी आणि मान-पानाच्या नावाखाली होणारी वरात या सर्वांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. मात्र, या सर्व बडेजावाला फाटा…

