Swarajyatimesnews

लोकसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी; कोरेगाव भिमाच्या सर्वांगीण प्रगतीचे कृतिशील सक्षम युवा नेतृत्व – कोमल नितीन गव्हाणे

लोकविश्वास हीच खरी ताकद, समाजसेवा हीच ओळख आणि विकास हेच ध्येय; शिक्षण, संस्कार, संवेदनशीलता व दूरदृष्टीच्या बळावर कोरेगाव भीमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सक्षम नेतृत्व. कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे आहे. या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत…

Read More
Swarajyatimesnews

व्यापाऱ्यांना दिलासा! अडचणींवर तात्काळ उपाय; बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा इशारा

शिक्रापूरमध्ये व्यापाऱ्यांसाठी विशेष बैठक; खंडणीखोर, रोडरोमिओ आणि बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  “शिक्रापूरमधील व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये. खंडणी, दमदाटी, धमक्या किंवा बेकायदेशीर त्रास देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही,” असा ठाम विश्वास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे…

Read More
स्वराज्य टाईम्स

तुकाराम मुंढेंच्या धडाक्याने ताटातील ‘लाल’ रंग हद्दपार; ग्राहकांच्या आरोग्याला मोठा दिलासा

अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईचा ग्रामीण महाराष्ट्रातही प्रभाव; मिसळ, चायनीज, तंदुरी, पनीरसह विविध खाद्यपदार्थांतील कृत्रिम रंगांचा वापर घटला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईचा प्रभाव आता शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगांवर प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

Nasarapur नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी.. पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

फाशीची शिक्षा सुनावताच चिमुकलीच्या आई-वडिलांचा आक्रोश; नराधम भीमराव कांबळे मान खाली घालून उभा स्वराज्य टाईम्स प्रतिनिधी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने “मरेपर्यंत फाशी” अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल देताना या गुन्ह्याला “रेअरेस्ट ऑफ रेअर”…

Read More
Swarajyatimesnews

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिक्रापूरच्या सुधीर मुळे यांचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान

स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा  ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची चळवळ उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे ASN कॉम्प्युटर एज्युकेशन, शिक्रापूरचे संचालक सुधीर व्यंकटराव मुळे यांना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ सन्मान प्रदान करण्यात आला. मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. भारतीय जैन संघटना (BJS) आणि दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने…

Read More
Swarajystimesnews

श्रमदान, वृक्षारोपण अन् शिवविचारांचा संगम ‘आपला मावळा’ने चेतवली इतिहास संवर्धनाची ज्योत  

आपला मावळा’च्या मोहिमेत वढू-तुळापूर येथे स्वच्छता, वृक्षारोपण आणि शिवव्याख्यान, ‘गड-किल्ले संवर्धनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव भिमा (ता . शिरूर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या वढू-तुळापूर भूमीत इतिहास संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन…

Read More
Swarajyatimesnews

ब्रेकिंग न्यूज: जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ! मिडल ईस्ट तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठे बदल; शेअर बाजारात घसरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर मिडल ईस्ट (Middle East) मधील वाढत्या राजकीय तणावाचा आणि युद्धाच्या परिस्थितीचा थेट आणि मोठा फटका जागतिक बाजारपेठेला बसला आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत असून, याचा थेट परिणाम जागतिक शेअर बाजारावर. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे.(Crude Oil Prices) कच्च्या तेलाच्या…

Read More
Swarajyatimesnews

चासकमानचे पाणी तातडीने सोडणार, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन शिक्रापूर राजाराम गायकवाड  चासकमान विभागाअंतर्गत येणाऱ्या कालवा क्रमांक ११, १२, १३ तसेच वेळ नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी तातडीने सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. १) चासकमान विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धनंजय गावकर यांच्या कार्यालयात ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून ४ किंवा ५ जूनपर्यंत कोणत्याही…

Read More
Swarajyatimesnews

पाबळ ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात सर्व सुविधा उपलब्ध होणार; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एमपल्ले यांचे आश्वासन

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि बाळंत विभाग येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल. तसेच, पुढील एका महिन्यात शवविच्छेदन (Post-Mortem) सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी दिली आहे. पाबळ रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत डॉ. एमपल्ले यांनी शुक्रवारी (ता….

Read More
Swarajyatimesnews

Aggreko India : फुलगावचा जागतिक औद्योगिक नकाशावर उदय! ‘ॲग्रेको इंडिया’ उभारणार ४०० कोटींचे महाकाय केंद्र

उद्योगवाढीसाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहील : जि. प. सदस्य, किरण साकोरे स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला कमालीची गती देणारी एक अत्यंत मोठी आणि अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. ऊर्जा आणि तापमान नियंत्रण क्षेत्रातील जगातील आघाडीची महाकाय कंपनी ‘ॲग्रेको इंडिया’ ही पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे तब्बल ४०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. या…

Read More
error: Content is protected !!