Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बीजेएस वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप
वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित…
धक्कादायक ! छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजामुळे ‘पीएसआय’चा गळा चिरला, प्रकृती गंभीर
कर्तव्यावर निघालेल्या पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. (A PSI who was on duty had his throat…
धक्कादायक ! शाळकरी मित्रानेच केला मित्राचा खून; प्रेत सोयाबीनच्या गुळीत पुरले
औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी…
मुंबईत रात्रीची वेळ , शिरूर तालुक्यातील मुलींच्या समोर मोठ्या अडचणी… आणि भावासारखे मदतीसाठी रात्री धावले प्रदीप कंद
पोलीस भरतीसाठी गेलेल्या मुलींसाठी अर्ध्यारात्री धावून जात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रदीप कंदांच्या सहृदयतेचे व माणुसकीचे होतेय कौतुक मुंबई सारखे अनोळखी आणि मोठे शहर त्या शिरूर तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील १० ते १२ मुली रात्री मुंबईसारख्या शहरात पोलीस भरतीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा पोहोचल्यानंतर त्यांना राहण्याच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी…
पुण्यातील मंचर येथे डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.डॉ. वाळे हे मंचर येथे राहतात आणि राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते दुपारी समर्थ…
भाचीने पळून जावून केले लग्न, बदनामीच्या भीतीने मामला आला राग, मामाने लग्नाच्या जेवणात मिसळले विष..
कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील…
वाघोलीत माझ्या घरी का राहतेस, म्हणून जावयाकडून सासूला मारहाण तर मेव्हुणीवर चाकू हल्ला..
वाघोली (ता. हवेली) येथे सासूला घरातून निघून जाण्याची धमकी देत जावयाने मारहाण केली आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हणीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पुष्पा वामन शेलार (वय ६५, रा. वाघोली, केसनंद रोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९, रा. वाघोली, केसनंद रोड) याच्यावर…
पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी, पुढच्या महिन्यात होती निवृत्ती
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरे अपत्य असल्यामुळे आणि लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली. दांगट यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंब नियमांनुसार, महापालिकेच्या पदांवर नियुक्तीसाठी दोन अपत्यांपर्यंतची अट आहे….
नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; पतीने घेतला गळफास,पत्नी व प्रियकर अटकेत
देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे ३० वर्षीय रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड याने २८ डिसेंबर २०२४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपासात पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. रमेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये पत्नी ताराबाई हिचे रवी गांगड याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा…
धेय्य साध्य करा, सत्कर्म करा, समाजहिताची सांगड घालत आयुष्य आनंदी बनवा – व्यवस्थापक सुरेश साळुंखे
वाडेगाव येथील भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला उत्साहात सुरुवात वाडेगाव (ता. हवेली): प्रत्येकाने सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी सत्कर्म करणे अत्यावश्यक आहे, कारण कर्म फिरून आपल्याकडेच परत येते. सत्कर्म आणि समाजहिताची सांगड घालून जीवन अधिक सुखी करता येते, असे प्रेरणादायी विचार भारतीय जैन संघटनेचे प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके यांनी मांडले. वाडेगाव येथे…
