Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
जवानाच्या पायाला वाकून स्पर्श करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ भावूक करतोय संपूर्ण देशाला!
l lनवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून देशभरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. व्हिडिओमध्ये एक चिमुकली मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या लष्करी जवानांकडे धावत जाते. ती त्यांच्या समोर उभी राहून प्रेमाने वर पाहते. जवानही हसत हसत तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो. तेवढ्यात ती लहानगी…
पत्नीवर वार करत नवऱ्याने घेतली फाशी …पोलिस तपासात उघड
मांजरी खुर्द (ता.हवेली)येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात नवीन माहिती समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय ४२) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी उज्वला (वय ४०) ही बाजूला बेडवर…
चाकणला नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार
मेदनकरवाडी (ता.खेड) चाकण पोलिस स्टेशन परिसरात एक खळबळजनक व संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ मे) ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली असून आरोपीला पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित…
न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुल व श्रीमती सुभद्राबाई भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम
मागील ८ वर्षांपासून श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजची १००% निकालाची परंपरा कायम लोणीकंद (ता. हवेली) न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुल व श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले असून अनेक विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त टक्के मिळाले असून दहावीतील चिन्मय जाडे या विद्यार्थ्याने ९७%गुण तर बारावीतील बारावीमध्ये सुनोवा डे या विद्यार्थ्यांचा ९६% गुण…
चाकणला नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडले; वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू
चाकण (ता. खेड) मुंबई-पुणे महामार्गावर चाकण फाट्याजवळ मंगळवारी रात्री नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मिथून धेंडे (वय ४१, रा. उरुळी कांचन, पुणे) हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना चिरडले. गाडी बंद केल्यानंतर ट्रक चालकाने गाडी पुन्हा सुरु करून ट्रक पळवत धेंडे यांच्यावर चढवला.त्यात…
हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A case has been registered against Dattatray Namdev Kale, Sub-Inspector of Hinjewadi Police Station under Chinchwad Police Commissionerate, for demanding a bribe.) तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात…
धक्कादायक! मांजरी खुर्द येथे फळविक्रेत्या दांपत्याची आत्महत्या
मांजरी खुर्द (ता.हवेली) – पुण्यातील वाघोली जवळील मांजरी खुर्द येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) या फळविक्रेत्या दांपत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना रविवारी (११ मे) रात्री घडली असून सोमवारी (१२ मे) सकाळी उघडकीस आली. प्राथमिक…
शिक्रापूरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर विजय रॅलीद्वारे भारतीय लष्कराला सलाम
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर ग्रामस्थांनी भव्य विजय रॅलीचे आयोजन करून लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून…
शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण
शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी…
स्वच्छता हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ
कार्ला (ता. मावळ) दिनांक १मे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वैयक्तिक स्वच्छतेसोबत प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छता ही अंगीकृत करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकानी आपली जबाबदारी ओळखून यशस्वी पार पाडावी असे प्रतिपादन अतिरिक्त अभियान…
