आषाढी वारीच्या भक्तिरंगात विशेष विद्यार्थ्यांची पालखी; वृक्षदिंडीने पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
शिक्रापूर प्रतिनिधी : राजाराम गायकवाड आषाढी वारीचे औचित्य साधत श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालय, मैत्री गोल्ड सोसायटी, शिक्रापूर येथे विशेष विद्यार्थ्यांनी साकारलेला पालखी सोहळा आणि वृक्षदिंडी परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पूजनाने…
