शिरूर हत्याकांड : प्रेमसंबंधातून महिला व दोन मुलांची हत्या, आरोपी अटकेत

Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती हद्दीत २५ मे रोजी एका बंद कंपनीमागे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिला आणि दोन मुलांच्या मृतदेहांचे गूढ पुणे ग्रामीण पोलिसांनी उलगडले आहे. प्रेमसंबंधातून ही तिहेरी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रांजणगाव गणपती येथील खंडाळा माथा परिसरात निर्जन ठिकाणी हे मृतदेह सापडल्याने सुरुवातीला मृतांची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. गेल्या प१५ दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांची विविध पथके या घटनेचा कसून तपास करत होती.

टॅटू आणि सीसीटीव्ही तपासणी ठरली महत्त्वाची: नवे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल रुजू झाल्यानंतर रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली ही पहिलीच मोठी घटना होती. मृतांपैकी महिलेच्या हातावर राजरतन’, ‘जयभीम’ आणि ‘आरएस’ असे टॅटू होते, हा एकमेव पुरावा पोलिसांना मिळाला. या आधारे पोलिसांनी शिरूर परिसरात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तसेच, महिलेचे छायाचित्र इतर जिल्ह्यांमध्येही प्रसिद्ध करण्यात आले.

या तपासादरम्यान, पोलिसांनी सुमारे १६,५०० भाडेकरूंची तपासणी केली. पुणे ते राहुरी, अहमदनगर महामार्गावरील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः तपास पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहा पथकांमधील २८ अंमलदार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये माहिती घेण्यासाठी पाठवण्यात आले होते.

बीडमधील बेपत्ता तक्रारीतून उलगडला तपास: अखेर, या घटनेचा तपास करत असताना, बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ९ मे रोजी एका महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याचे पोलिसांना समजले. बेपत्ता असलेल्या महिलेचे वर्णन मृत महिलेशी जुळत असल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला.

प्रेमसंबंधातून तिहेरी हत्या: या तपासात मृत महिला स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) हीच बेपत्ता महिला असल्याची खात्री पटली. पोलिसांनी स्वातीचा पती केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता, स्वाती तिच्या दोन मुलांसह, स्वराज (वय २ वर्षे) आणि केशव (वय १ वर्षे), आळंदी येथे तिच्या आई-वडिलांकडे गेली असल्याचे समजले.

स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. २३ मे रोजी रात्री स्वाती तिच्या बहिणीचा दीर गोरख पोपट बोखारे (रा. सरदवाडी, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्या मोटारसायकलवरून आळंदीहून निघाली होती. स्वातीचे आई-वडील आळंदी येथे मोलमजुरी करत असल्याने त्यांना स्वातीबद्दल माहिती नव्हती.

पोलिसांनी गोरख पोपट बोखारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, धक्कादायक सत्य समोर आले. आरोपी गोरख बोखारे याचे स्वातीशी प्रेमसंबंध होते. स्वाती त्याच्या चुलतमामाची मुलगी असल्याने ते नातेवाईक होते आणि त्यांच्यातील वादात गोरख मध्यस्थी करत असे. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. स्वाती गोरखकडे वारंवार लग्नाची मागणी करत होती.

२३ मे रोजी रात्री गोरख बोखारेने स्वातीला तिच्या मुलांसह आळंदीहून मोटारसायकलवर घेतले. रांजणगाव गणपती हद्दीतील ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस, खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याने मोटारसायकल थांबवली. स्वातीने केलेल्या लग्नाच्या मागणीला विरोध करण्यासाठी त्याने स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर त्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव एमआयडीसीचे फौजदार निळकंठ तिडके, अविनाश थोरात,सविता काळे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे फौजदार महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजू मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरदी, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापुरे, रांजणगाव एमआयडीसीचे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पोलीस स्टेशनचे विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, तसेच बीड जिल्ह्यात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!