माऊली कटके यांच्या प्रचारासाठी व विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार – प्रदीप कंद
शिरूर, ता. ४ ऑक्टोंबर शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राजकीय पटलावर अविश्वसनीय घडामोडी घडल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळे महायुतीच्या गोटात एकजुट निर्माण झाली आहे. ४ ऑक्टोंबर रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा) चे शांताराम कटके यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांची मुख्य लढत होणार महायुतीने बंड शमावल्याने सलामीलाच मोठा राजकीय डाव जिंकला असून महायुतीचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके व विद्यमान आमदार ॲड. अशोक पवार यांच्यात समोरासमोर लढत होणार आहे.
महायुतीची एकजूट आणि प्रदीप कंदांची भूमिका -अर्ज माघारीनंतर बोलताना प्रदीप कंद यांनी स्पष्ट केले की, “मी महायुतीचा एकनिष्ठ आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे. आता माऊली कटके यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार आहे.” देवेंद्र फडणवीस यांनी कंद यांना योग्य पदी संधी देण्याचे आश्वासन दिल्याने कंद यांनी सन्मानपूर्वक माघार घेतली आहे. त्यांच्या माघारीने कटके यांच्या प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले असून हवेलितील मुख्य राजकीय वजनदार प्रभावी पदाधिकारी आता प्रचारात आल्याने कटके यांची लढत सुखकर झाली आहे.
काटे की टक्कर – श्रावणबाळ विरुद्ध कार्यसम्राट – शिरूर हवेली मतदारसंघात आता मुख्य लढत विद्यमान आमदार अशोक पवार आणि महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्यात रंगणार आहे. माऊली कटके हे श्रावणबाळ आणि जनसेवक म्हणून परिचित असून, विकास कामांसह, माणुसकी असलेले माऊली कटके यांच्याविषयी प्रचंड आपुलकी व जिव्हाळा असून त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार अशोक पवार हे विकास कामांमुळे कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात. या दोन नेत्यांमध्ये होणारी लढत काटे की टक्कर ठरणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
महायुती मोठ्या ताकदीने लढणार – अर्ज माघारीनंतर महायुतीचे एकवटलेले बळ आणि एकनिष्ठता पुन्हा सिद्ध झाली आहे. कंद,पाचर्णे, पाचंगे, कटके यांचे अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते आता कटके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकदीने मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.
प्रदीप कंद यांनी जिंकले वरिष्ठांचे मन – राजकारणात पदासाठी पक्ष बदलणारी प्रसंगी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे उमेदवार दिसत असले तरी प्रदीप कंद हे सुसंस्कृत,आज्ञाधारी, पक्षनिष्ठ तसेच वरिष्ठांच्या शब्दाला मान देत स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देत पक्षादेश व पक्षशिस्त पाळणारे नेतृत्व असल्याने प्रदीप कंद यांची माघारी म्हणजे माऊली कटके यांची मताधिक्य वाढवणारी ठरणार असून प्रदीप कंदांनी वरिष्ठांसह, महायुतीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांचे मन जिंकले आहे.
यावेळी भाजपा पक्षाची शिस्त पाहायला मिळाली यामध्ये उद्योग आघाडीचे संजय पाचंगे, शिरूर विधानसभा मतदारसंघात जनतेने महायुतीचा विजय मिळवण्याची तयारी सुरू केली असून, माऊली कटके यांच्या नेतृत्वात महायुतीची वज्रमूठ अधिक बळकट होत चालली आहे.