Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन
कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…
सन्मान कोरेगाव भीमाच्या सुपुत्राचा… पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या संतोष घावटे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गावातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले सुपुत्र संतोष घावटे यांनी यशाचा नवा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावत त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली असून, त्यांच्या या यशामुळे कोरेगाव भीमा ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशानिमित्त ग्रामपंचायतीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संतोष घावटे…
कोरेगाव भीमाच्या कस्तुरी मुसमाडेची नासा भेटीसाठी निवड : शिरूर तालुक्याचा अभिमान
नेत्रदिपक यशामुळे कस्तुरी मुसमाडेची शालेय व्यवस्थापन समिती व गावाच्यावतीने काढण्यात आली सवाद्य मिरवणूक दिनांक २२ ऑगस्ट कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) पुणे जिल्ह्यातील तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांमधून शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील कस्तुरी मुसमाडे हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत यश मिळविण्याबरोबरच अमेरिका मधील नासाच्या भेटीसाठी जिल्हा परिषदेने घेतलेल्या परीक्षेमधून निवड…
संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच यशाचा मंत्र – शंकर भूमकर
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न…
शिक्रापूरमध्ये ‘पर्यावरणपूरक मंदिर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी, शिक्रापूर गावात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यादाम प्रशाला, शिक्रापूर येथील १९८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘पर्यावरणपूरक मंदिर’ ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत गावातील चार मंदिरांमध्ये पॉलिथीनमुक्त परिसरासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिरांचे परिसर स्वच्छ आणि पॉलिथीनमुक्त…
लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
पुणे: लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने ठाणे अंमलदार कक्षात स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय सौरभ पोटभरे (रा. पेरणे फाटा) या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. सौरभ पोटभरे पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने…
बालरंगभूमी परिषदेच्या नाट्यछटा स्पर्धेत बालकलाकारांचा जल्लोष!
राजाराम गायकवाड जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर): बालरंगभूमी परिषद आणि पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये राज्यातील बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या स्पर्धेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या स्पर्धांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळतो. शिक्षण क्षेत्रात अशा…
‘शिवाजी महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य घडवले’ – ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे
राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन…
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन बैठक
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात बैठक झाली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे शहर आमदार संजय केळकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील…
सरपंच संदीप ढेरंगे यांच्या पाठीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची कौतुकाची थाप
दिल्ली: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकमेव आदर्श सरपंच म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच, संदीप ढेरंगे यांची निवड झाली आहे. या विशेष निमंत्रणामुळे पुणे जिल्ह्यासह कोरेगाव भीमा गावासाठी हा एक मोठा सन्मान आहे.या गौरवपूर्ण क्षणापूर्वी सरपंच संदीप ढेरंगे यांनी पत्नी अंजली ढेरंगे आणि गावकऱ्यांसह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ…
