Swarajyatimesnews

शिरूरच्या  शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे 

शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी…

Read More
swarajyatimesnews

“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!

कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी…

Read More
Swarajyatimesnews

चासकमान कालव्यातून शिक्रापूर परिसरात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण, शेती, जनावरे व पशुपक्षी यांची तहान भागवणे व पिकांना जागवण्यासाठी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने चासकमान कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून रणरणत्या उन्हाता शेतकरी, नागरिक, जनावरे व पशुपक्षी यांच्यासाठी तरी आता पाणी सोडण्यात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून चासकमान बंधारे विभाग टाटाकीम पाणी…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्साहात सुरुवात

शिक्रापूर (ता. शिरूर) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्हा परिषदेकडून केंदूर ग्रामपंचायतीचा सन्मान; क्षयरोगमुक्त गावाचा बहुमान

केंद्रूर (ता. शिरूर) , २६ मार्च —पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर ग्रामपंचायतीचा “क्षयरोगमुक्त गाव” म्हणून विशेष सन्मान करण्यात आला आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे केंदूरने गव्हाणे सन्मान मिळवलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केंद्रूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) गाव म्हणून सन्मान करण्यात आला. सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन…

Read More
Swarajyqtimesnews

कोरेगाव भिमा येथे कीयोन कंपनीत शिरला बिबट्या.. 

नागरिकांनी काळजी घ्यावी, वनविभाग कर्मचारी कियोन कंपनीत दाखल बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू – सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस  कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे सकाळी एक दीड दोन वर्षांचा बिबट्या गव्हाणे वस्ती जवळ असलेल्या कियोन कंपनीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून  वनविभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस यांनी नागरिकांनी घाबरून जावू नये व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी…

Read More
Swarajyatimesnews

दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये

दिनांक २ मार्च केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला…

Read More
Swarajyatimesnews

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात 

लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू

आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शाळकरी मित्रानेच केला मित्राचा खून; प्रेत सोयाबीनच्या गुळीत पुरले

औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी…

Read More
error: Content is protected !!