शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर ग्रामस्थांनी भव्य विजय रॅलीचे आयोजन करून लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचे टॉप ५ दहशतवादी ठार केले. या कारवाईत मुदस्सर खादियन, अबू जुंदाल, हाफीज मुहम्मद जमील, मोहम्मद युसूफ अझहर आणि खालिद उर्फ अबू आकाशा यांचा समावेश होता
शिक्रापूर ग्रामपंचायतिचेआदर्श सरपंच रमेश गडदे, माजी सैनिक संघटना आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रॅली मोती चौक, विद्याधाम प्रशाला, चाकण चौक, पाबळ चौक, महात्मा फुले चौक या मार्गांवरून काढण्यात आली. या प्रसंगी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच वंदना भुजबळ, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी सैनिक संघटनेचे सुरेश उमाप, माजी कक्ष अधिकारी देवेंद्र कोळपकर, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे, शामराव फुलावरे, मोहन विरोळे, डॉक्टर सातकर , अंकुश घारे, स्वप्निल महाजन, सतीश सासवडे, हाजी शिराज शेख, समशेर तांबोळी, मोहम्मद तांबोळी, विश्वास राऊत, गणेश भुजबळ, सुभाष भुजबळ, गणेश राऊत, पप्पू चव्हाण,अनिता भुजबळ, गजानन इंगळे, राहुल राजगुरू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या शेवटी उपस्थितांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमातून शिक्रापूर ग्रामस्थांनी भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करत देशभक्तीचा संदेश दिला.
भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.