Swarajyatimesnews

निलंबित पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई – सेवेतून निलंबित असलेले माजी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (सोमवारी) रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील नागदरा हे मूळ गाव असलेले सुनील नागरगोजे हे अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी पोलिस सेवेत…

Read More
Swarajyatimesnews

मुंबईतील ‘मराठा’ बांधवांना कोरेगाव भीमाचा आधार: लोणचे,चटण्या,बिस्किटे ,पाणी बॉटल्ससह चपात्या पाठवल्या एक हजार

पुणे – मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील अखिल म्हसोबा नगर गणेश मित्र मंडळ, जय जिजाऊ महिला ग्रामसंघ, ढेरंगे वस्ती येथील बांधवांनी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मदतीचा मायेचा हात दिला आहे. आंदोलक बांधवांना जेवण आणि पाणी कमी पडू…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये रेकॉर्डवरील आरोपीचा पोलिसांवर गुप्तीने हल्ला दोन पोलिस जखमी तर प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आरोपीचा मृत्यू

शिक्रापूर (ता. शिरूर): येथील मलठण फाट्यावर आज (दिनांक ३० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता एक थरारक घटना घडली. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडीचा आरोपी लखन भोसले (वय २५, रा. खटाव, जि. सातारा) याने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गुप्तीने हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांना हवा असलेला…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमाच्या सानवी मोटेची राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड 

पुणे: ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ९५४ कोरेगाव पुनर्वसनची विद्यार्थिनी कुमारी सानवी अतुल मोटे हिने लक्षवेधी यश मिळवले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत, सानवीची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने सादर केलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक नाट्यछटेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. सानवी मोटेचे…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील जुने उद्योजक हरिभाऊ ढेरंगे यांचे निधन

कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सन्मान कोरेगाव भीमाच्या सुपुत्राचा… पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या संतोष घावटे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गावातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले सुपुत्र संतोष घावटे यांनी यशाचा नवा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावत त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली असून, त्यांच्या या यशामुळे कोरेगाव भीमा ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशानिमित्त ग्रामपंचायतीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संतोष घावटे…

Read More
Swarajyatimesnews

बालरंगभूमी परिषदेच्या नाट्यछटा स्पर्धेत बालकलाकारांचा जल्लोष!

राजाराम गायकवाड जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर): बालरंगभूमी परिषद आणि पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये राज्यातील बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या स्पर्धेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या स्पर्धांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळतो. शिक्षण क्षेत्रात अशा…

Read More
Swarajyatimesnews

‘शिवाजी महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य घडवले’ – ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे

राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन…

Read More
Swarajyatimesnews

पत्नी नांदायला येत नाही तसेच नंबर ब्लॉक केल्याने बापाने चार मुलांना विहिरीत ढकलून केली आत्महत्या

राहाता (अहिल्यानगर) : कौटुंबिक वादातून राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात पित्याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृतांची नावे – अरुण सुनील काळे (वय ३०, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) मुले : शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) व कबीर (५)अरुण काळे याची पत्नी शिल्पा माहेरी (ता. येवला) गेली होती….

Read More
Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयात ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वी आयोजन: संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन

पुणे, २ ऑगस्ट २०२५: बीजेएस एएससी कॉलेज, वाघोली येथे आज आयएसएएस मुख्यालय आणि आयएसएएस पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठित ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या परिषदेने संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून वैज्ञानिक विचार आणि सहकार्याला प्रोत्साहन दिले. या परिषदेत १०० हून अधिक उपस्थिती होती, ज्यात ३५ प्रभावी पोस्टर सादरीकरणे…

Read More
error: Content is protected !!