रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
रायगड, दि. २३ मार्च — कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यांनी ३१ मे २०२५ पर्यंत हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत उभारलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ही शिवकालीन इतिहासात कुठेही नमूद नाही….
