स्वराज्य टाईम्स न्यूज

बारामती हादरली! १२वीच्या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रांगणात खून

बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एका १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना महाविद्यालयाच्या आवारात घडली असून, यामुळे विद्यार्थी, शिक्षक, आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. आज सकाळी अकराच्या सुमारास एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. हल्ल्यात…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूरमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संतप्त मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर)  येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अर्थात फाशीची मागणी केली आहे. या निषेध मोर्चात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात…

Read More
स्वराज्य टाईम्स news

चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी

चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

धक्कादायक! शिक्रापूर येथे अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला तत्काळ अटक शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा  १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वाघोलीत आरएमसी मिक्सरची ट्रकची स्कूल बसला धडक

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण अपघातांचे सत्र कायम वाघोली (ता. हवेली)  येथील वाघोली-लोहगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा या भागातील अपघातांच्या सत्राला वाचा फोडली आहे. आरएमसी मिक्सर ट्रकने (काँक्रीट मिक्सर) स्कूल बसला धडक दिली, ज्यामध्ये शाळकरी मुलांचे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी

चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.  विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी

चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांमधून उत्पन्नाची नवी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस ॲक्शन मोडवर

बेशिस्त दुचाकी चालकांवरिल कारवाईचे नागरिकांमधून स्वागत प्रतिनिधी नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्न,फटक्यासारखा आवाज काढणे, कवणा हेल्मेट,अपलवयीन मुलांनी वाहन चालवणे ,बेशिस्तपणे वेगाने वाहन चालवणे यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलण्यात येत असून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील अँक्शन मोडवर आले असून बेशिस्त वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतल्याचे…

Read More
error: Content is protected !!