Swarajyatimesnews

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

आळंदी ( ता. खेड) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी भक्तीचा अनोखा साज चढला आहे! नांदेड येथील निष्ठावान वारकरी, भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आपल्या असीम श्रद्धेचे प्रतीक म्हणून आळंदी मंदिरास तब्बल एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या देदीप्यमान मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून, रामीनवार यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा हा एक…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत

“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….

Read More
Swarajyatimesnews

Jejuri Accident : जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघातात आठ ठार, पाच जण गंभीर जखमी

जेजुरी – जेजुरी-मोरगाव रोडवरील श्रीराम ढाब्याजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये ढाब्यासमोर उभे असणारे व टेम्पोमधील साहित्य उतरवणारे नागरिक आणि स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवासी यांचा समावेश आहे.  पुण्याहून मोरगावकडे भरधाव वेगाने निघालेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX…

Read More
Swarajyatimesnews

द टाटा पॉवर कंपनी लि. चे ७/१२ वरील नाव कमी करणे प्रकरणी  मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित

७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी कारवाई पुणे, १७ जून २०२५: मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना ७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ निलंबित केले आहे. द टाटा पॉवर कंपनी लि. चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कासाठी नोंदवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. या निलंबनामुळे…

Read More
Swarajyatimesnews

ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन

अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…

Read More
Swarajyatimesnews

नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू; गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…

आजरा शहरात एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आंबोली येथे फिरायला…

Read More
Swarajyatimesnews

बायकोसाठी कायपण! मध्य प्रदेशात पतीने पत्नीसाठी बांधलं ताजमहालासारखं घर

मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आवडीनुसार खास ताजमहालसारखं आलिशान घर बांधलं आहे. आनंद प्रकाश चौकसे असं या गृहस्थाचं नाव असून, त्यांनी आपल्या पत्नीसाठी 4BHK घर उभारलं आहे.हे घर पाहताना खरा ताजमहालच समोर आहे असं वाटतं. पांढऱ्या मकराना संगमरवरातून उभारलेलं हे घर आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे, पण सौंदर्य आणि…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात मावळामध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

पुणे, दि. १५ जून – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सुट्टी असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक जण पुलावर उभे…

Read More
Swarajyatimesnews

Air India Flight Crash: लंडनला निघालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा ३ मुलांसह करून अंत

महिनाभरापूर्वीच सिलेक्शन, स्वप्न अधुरे राहिले! अहमदाबाद,: १३ जून २०२५– अवघ्या महिन्याभरापूर्वीच लंडनमधील हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या डॉ. प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. कौनी व्यास तसेच त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांचा अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी (१२ जून २०२५ रोजी) झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे या कुटुंबाचे स्वप्न होते, मात्र…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर हत्याकांड : प्रेमसंबंधातून महिला व दोन मुलांची हत्या, आरोपी अटकेत

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती हद्दीत २५ मे रोजी एका बंद कंपनीमागे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिला आणि दोन मुलांच्या मृतदेहांचे गूढ पुणे ग्रामीण पोलिसांनी उलगडले आहे. प्रेमसंबंधातून ही तिहेरी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. रांजणगाव गणपती येथील खंडाळा माथा परिसरात निर्जन ठिकाणी हे मृतदेह सापडल्याने सुरुवातीला मृतांची ओळख पटवणे पोलिसांसाठी…

Read More
error: Content is protected !!