
स्वच्छता हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ
कार्ला (ता. मावळ) दिनांक १मे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वैयक्तिक स्वच्छतेसोबत प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छता ही अंगीकृत करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकानी आपली जबाबदारी ओळखून यशस्वी पार पाडावी असे प्रतिपादन अतिरिक्त अभियान…