Swarajyatimesnews

महावितरणला पावसाचा फटका; ९२४ वीज खांब पडले

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर २७ मे  – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे. पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव…

Read More
Swarajyatimesnews

माता रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी देणार उजाळा

पुणे, २७ मे २०२५ – महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणींचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर “रमाई संशोधन प्रकल्पा”द्वारे बार्टी संस्था प्रकाश टाकणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे येथे रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील पूल गेला वाहून.. घर, गोठ्यामध्ये शिरले पाणी..शेतीचेही नुकसान 

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून.. कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम…

Read More
Swarajyatimesnews

थेऊर फाटा येथे अपघातात माळकऱ्याचा मृत्यू; पिशवीत सापडले 2.40 लाख रुपये

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा येथे बुधवारी (ता. 21) पहाटे एका अनोळखी माळकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तो रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत बँक ऑफ बडोदा समोर घडली. मृत व्यक्ती लोणी काळभोर परिसरात नागरिकांकडून भिक्षा मागत असल्याचे सांगण्यात येते.घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.  या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

Read More
Swarajyatimesnews

लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…

Read More
Swarajyatimesnews

विनोदी कीर्तनकार ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन

सोलापूर –ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय प्रचारक ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि कीर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर महाराज गिरी हे सोलापूर…

Read More
swarajyatimesnews

“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!

कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू जानकी बाळासाहेब गळगुंडे (मूळ रा. घोटी, ता. माढा) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.१३ मे रोजी जानकीचा विवाह समीर हरिदास पराडे (रा. बाभूळगाव) याच्याशी नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला होता. विवाहानंतर तिचा…

Read More
Swarajyatimesnews

जवानाच्या पायाला वाकून स्पर्श करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ भावूक करतोय संपूर्ण देशाला!

l lनवी दिल्ली  – सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून देशभरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. व्हिडिओमध्ये एक चिमुकली मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या लष्करी जवानांकडे धावत जाते. ती त्यांच्या समोर उभी राहून प्रेमाने वर पाहते. जवानही हसत हसत तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो. तेवढ्यात ती लहानगी…

Read More
error: Content is protected !!