“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!

swarajyatimesnews

कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी रुपयांची  तब्बल ४२ गुंठे शासकीय जागा पाणी योजनेसाठी मोफत मिळवून एक ऐतिहासिक यश ग्रामपंचायतीने मिळवल्याने ग्रामस्थांनी फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

भिमा-भामा-इंद्रायणी नद्यांच्या पाण्याने नदी बारामाही भरून वाहते पण मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण व औद्योगिकीकरण यामुळे दूषित झालेल्या पाण्याने ग्रामस्थांना त्वचारोग, पाचनसंस्थेचे विकार, बालकांचे आरोग्याचे प्रश्न आणि महिलांचे , वृद्धांचे व नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न वाढीस लागले होते. ग्रामस्थांच्या या गंभीर समस्येची दखल घेत सरपंच ढेरंगे व  ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी घेत सातत्याने वनविभागाकडे पाठपुरावा सुरू केला. नऊ महिन्यांच्या सातत्यपूर्ण व अथक प्रयत्नांनंतर, शेवटी पाणी योजनेसाठी आवश्यक असलेली अमूल्य सरकारी जागा मोफत मिळवण्यात ग्रामपंचायतीला यश मिळाले.

या यशस्वी प्रयत्नांमध्ये जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे, वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक बबन दहातोंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, उपविभागीय अभियंता दत्ता पवार व माजी उपविभागीय अभियंता श्रीकांत राऊत यांनीही प्रभावी योगदान दिले.

ग्रामस्थांनी  फटाके वाजवत भरवले एकमेकांना पेढे –   पाणी योजनेसाठी कोरेगावकरांना मोफत ४२ गुंठे जागा मिळाल्याचे कळताच संपूर्ण कोरेगाव भिमा ग्रामस्थ आनंदून गेले त्यांनी फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवले व गावाने एकत्र येऊन यशाचा आनंद साजरा केला. 

     यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, घोडगंगेचे माजी संचालक कैलास सोनवणे, माजी सरपंच अशोक काशीद, विलास खैरमोडे, संगीता कांबळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, बबुशा ढेरंगे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बबन गव्हाणे, विवेक ढेरंगे, बाळासाहेब वाडेकर, जालिंदर ढेरंगे, अर्जुन गव्हाणे, वाडा गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब वाडेकर , उपसरपंच संपत माळी ,सुनील गव्हाणे, मायंबा ढेरंगे, राजाराम नळकांडे, बाजीराव ढेरंगे , बन्सी ढेरंगे ,माजी सरपंच संजय काशीद तानाजी ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

दूरदृष्टी, संघर्ष आणि यश व कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा – गावच्या विकासाची दूरदृष्टी ठेवत येणाऱ्या आव्हानांशी संघर्ष करत गावाला वन विभागाची ४२ गुंठे जागा मोफत मिळवण्याचे यश संपादन करत आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमाच्या जलक्रांतीची नवीन गाथा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

“कोरेगाव भिमा ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळाल्याने अनेक आरोग्याच्या प्रश्नांना कायमस्वरूपी विराम मिळणार आहे. हा केवळ एक टप्पा आहे, संपूर्ण गावचा विकास नियोजनबद्ध आणि सर्वांगीण करण्याच्या सकारात्मक दिशेने पुढे जाणार आहे. यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”– आदर्श सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत कोरेगाव भिमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!