Swarajyatimesnews

गौरवास्पद ! मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार  अवघ्या ५० हजारात राज्यातील पहिला विवाह सोहळा संपन्न

ना बडेजाव, ना डामडौल ,टोणगे कुटुंबियांनी ५० हजारांत लग्न करून दाखवलं,लग्न म्हणजे खर्च नाही, संस्कार! मराठा समाजाच्या आचारसंहितेने बदलली लग्नाची व्याख्या! पुणे – येथे मराठा समाजाने घालून दिलेल्या आचार संहितेचे पण करत अवघ्या ५० हजारात पार पडलेले राज्यातील हे पहिलेच लग्न असेल.  कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांचे चिरंजीव ॲड. प्रफुल्ल व हरिदास पवार…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा: २५ वर्षांनी भरला स्नेहसंमेलनाचा वर्ग! आठवला बालपणीचा स्वर्ग, बहरला आठवणींचा स्मृतीगंध’!

“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस…

Read More
Swaeajyatimesnews

“गोपीनाथ मुंडे तुमच्यामध्येच आहेत, मी त्यांनाच पाहते!” — पंकजा मुंडेंचा भावूक उद्गार

गोपीनाथ गड (परळी)- गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. “गोपीनाथ मुंडे आपल्यातून गेले याला ११ वर्षे झाली, पण ते आजही आपल्या मनामध्ये आहेत. त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमांचे आयोजन करतो,” असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “अपघाताने माणसे दुरावतात आणि कधी…

Read More
Swarajyatimesnews

गुंठामंत्री संस्कृती: वैष्णवीचा मृत्यू की सामाजिक नैतिक अधःपतन?

गुंठामंत्री संस्कृती’ हा शब्द आज केवळ जमिनीच्या मोजमापापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या समाजातील संवेदनशीलता, माणुसकी आणि मूल्यांच्या घसरणीचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी कुटुंबाला आधार देणारी, नात्यांना महत्त्व देणारी समाज रचना आज झगमगाटाच्या दुनियेत हरवून गेली आहे. अचानक आलेल्या श्रीमंतीने भौतिक सुखांचा ढीग दिला असला, तरी नात्यांमध्ये मात्र काळोख साठू लागला आहे. उद्योगनगरी ते…

Read More
Swarajyatimesnews

JSPM च्या विद्यार्थ्यांनी AI वर आधारित शेतीसाठी बनवले क्रांतिकारी अ‍ॅप

अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत मिळणार माहिती पुणे – जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (BSIOTR), वाघोली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी AI-ML आधारित अ‍ॅप तयार केले आहे. श्रीहर्ष देशमुख, अमन कुमार, अनिश बनसोडे आणि प्रितेश बिरादार यांनी तयार…

Read More
Swarajyatimesnews

माता रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी देणार उजाळा

पुणे, २७ मे २०२५ – महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणींचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर “रमाई संशोधन प्रकल्पा”द्वारे बार्टी संस्था प्रकाश टाकणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे येथे रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..

शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….

Read More
Swarajyatimesnews

शिरूर बसस्थानकावर पर्समधून ८ तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

शिरूर – शिरूर बसस्थानकावर पर्समधून ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिला चोरट्यांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. चोरी गेलेले सर्व सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना ११ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. रूपाली अनिल काळेल (रा. त्रिमूर्ती नगर, बारामती) या आपल्या मुलगी व भाचीसह एसटीने बारामतीला जात…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.  या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

Read More
Swarajyatimesnews

लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…

Read More
error: Content is protected !!