चासकमान कालव्यातून शिक्रापूर परिसरात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

Swarajyatimesnews

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण, शेती, जनावरे व पशुपक्षी यांची तहान भागवणे व पिकांना जागवण्यासाठी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने चासकमान कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून रणरणत्या उन्हाता शेतकरी, नागरिक, जनावरे व पशुपक्षी यांच्यासाठी तरी आता पाणी सोडण्यात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून चासकमान बंधारे विभाग टाटाकीम पाणी सोडण्यासाठी सकारात्मक  विचार करुन तातडीने पाणी सोडतील असा विश्वास शिक्रापूरचे आदर्श सरोंच रमेश गडदे , ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शिक्रापूर येथील  वेळ नदी बंधारे, राऊतवाडी व बुधे वस्ती, येथे पाऊस कमी झालेने पाणी नाही तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरींचे पाणी कमी झालेले आहे. सध्या चासकमान प्रकल्पाचे पाणी शिक्रापूर मधील वेळ नदीला सर्व ओढ्यांना व तळयामध्ये पाणी सोडण्यात यावे. पाणी सोडलेस पाणीपुरवठा विहिरीची व कुपनलीकेची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल व गावातील वाडय-वस्त्यांना पाणी पुरवठा करणे पिके जगवणे शक्य होईल तसेच जनावरे जगवणे शक्य होईल तरी वेळ नदी, बंधारे, राऊतवाडी व बुधे वस्ती, चारी नं. ११,१२, १३ ला चासकमान कॅनॉलचे पाणी सोडण्याची पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.

यावेळी  आदर्श सरपंच रमेश गडदे , उपसरपंच वंदना भुजबळ, प्रकाश वाबळे, सुभाष खैरे ,रमेश भुजबळ ,तानाजी राऊत, दत्तात्रय राऊत ,पंढरीनाथ गायकवाड ,अनिल राऊत,शाखाधिकारी सुनील म्हस्के उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!