नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य

Swarajyatimesnews

 कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्याकडून नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन ‘बॅग,वह्या,’ वाटप तर शासनाची पुस्तके व गणवेश वाटप उत्साहात साजरा

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!” या विधायक दृष्टिकोनातून प्रेरित होत, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे यांनी बॅग (दप्तर) व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांनी वह्या वाटप करत एक आदर्शवत शैक्षणिक मदतीचे काम करत आपल्या सामाजिक बांधिलकी जपत, नरेश्वर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग आणि  वह्या वाटप केले.शासनाची पुस्तके व गणवेश वाटपही करण्यात आले. हा केवळ बॅग,वह्या पुस्तकांचे वाटप नव्हे, तर ग्रामीण भागाच्या उज्वल भविष्यासाठी टाकलेले कृतीयुक्त आदर्श पाऊल आहे.

ज्ञानदानाचे विधायक उद्दिष्ट: या उपक्रमामागे केवळ वस्तू वाटप करणे हे उद्दिष्ट नव्हते, तर त्यामागे एक व्यापक दृष्टी होती. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, त्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील पालकांमध्ये शिक्षणाप्रती अधिक जागृती निर्माण करणे हेच या विधायक उपक्रमाचे मुख्य ध्येय होते. माजी सरपंच अमोल गव्हाणे यांच्या या दूरदृष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रेरणादायी वाटप सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिपक गुलाबराव ढेरंगे, उपाध्यक्ष पल्लवी प्रमोद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकी भीमराव गव्हाणे, शिक्षक लहू चव्हाण, शिक्षिका काटे मॅडम,शिक्षण तज्ञ सुनील गव्हाणे, जमीर शेख,भरत दरेकर,स्वाति भानुदास शिवले, शितल मगर,कुमार साखरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

ग्रामीन शिक्षणाला नवी ऊर्जा, नवी उमेद! माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्या या विधायक पावलामुळे नरेश्वर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेबद्दल समाजात एक अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्ये शाळेच्या गुणवत्तेबाबत आणि भविष्याबाबतचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे; त्यांना शालेय जीवनात पुढे जाण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.

हा उपक्रम केवळ शालेय वस्तूंच्या वाटपापुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रेरणा देणारे, विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे आणि समाजात शैक्षणिक बदल घडवणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.  

ही तर केवळ सुरुवात आहे हा फक्त एक उपक्रम नाही, तर शिक्षण क्षेत्रात सातत्याने सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  कार्यरत राहून विज्ञान, कला, खेळ, संगणक प्रशिक्षण अशा विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची मालिका राबविण्याचा  दृढ संकल्प आहे.” – माजी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!