गोरगरिबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – संस्थापक विठ्ठल ढेरंगे

Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : परिसरातील शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या अनेक गरजांना साथ देत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे तसेच आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून, मागील ३६ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठल ढेरंगे यांनी केले.

संस्थेची ३६ वी वार्षिक सभा चेअरमन नामदेव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष शांताराम फडतरे, संचालक शिवाजी राऊत, नामदेव विटकर, प्रकाश ढेरंगे, संजय फडतरे, कृष्णा ढेरंगे, मंजुळा ढेरंगे, वृषाली ढेरंगे तसेच व्यवस्थापक तनुजा मदगुले व राजेंद्र वाळके प्रमुख उपस्थित होते.

चेअरमन नामदेव ढेरंगे म्हणाले की, सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य असून अधिकाधिक सुविधा देणे, बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणे आणि संस्थेवरील विश्वास वाढवणे हे आमचे ध्येय आहे.

कानिफनाथ पतसंस्थेला ‘अ’ दर्जा ऑडिट वर्ग, ७३ लाख २० हजारांचे कर्जवाटप, ९६ टक्के वसूली, ९ टक्के लाभांश यशस्वीरित्या मिळाला आहे. समृद्ध व्यवस्थापन, तत्पर कार्यपद्धती, अखंड सहकार्य, आधुनिक विचारप्रणाली आणि व्यवहार कुशलता या पंचसूत्रीवर चालणारी ही ग्रामीण भागातील अग्रगण्य पतसंस्था आहे.

सभेला माजी चेअरमन शिवाजी माधव ढेरंगे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, नितीन गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सरचिटणीस शिरूर तालुका भाजपाचे संपत गव्हाणे, माजी संचालक शांताराम ढेरंगे, संचालक विविध कार्यकारी सोसायटी महादेव फडतरे, संचालक खरेदी विक्री संघ नारायण ढेरंगे, पुणे जिल्हा भ्रष्टाचार समिती अध्यक्ष पांडुरंग ढेरंगे,मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील भांडवलकर,  कॉन्ट्रॅक्टर महेश गव्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने सभासदांत आनंदाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!