Swarajyatimesnews

प्रेरणादायी! दगड फोडणाऱ्याचा पोरगा झाला अधिकारी…

चपरासी झाला तरी चालेल या वडिलांच्या शब्दांनी घडवला सरकारी अधिकारी दगड फोडून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारा समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा या समाजापासून कोसो दूर आहेत. भूमिहीन असल्याने या समाजातील अनेक मुलं दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पोटापाण्याची सोय बघतात.मात्र याच अत्यंत मागास समाजातील मुलाने एमपीएससी परीक्षेचं मैदान मारलं…

Read More
Swarajyatimesnews

बी जे एस महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

३०६ खेळाडूंनी घेतला उस्फूर्तपणे सहभाग वाघोली (ता. हवेली) : भारतीय जैन संघटनेच्या बी जे एस महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ हा प्रचंड उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयीन प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ३०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागामुळे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व क्रीडा शिक्षक डॉ. रमेश गायकवाड यांनी त्यांना अभिनंदन…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! वाघोलीत चापट मारल्याच्या रागातून कंटेनर चालकाने दुसऱ्याला चाकाखाली चीरडल्याने जागीच मृत्यू

हॉटेलमधील बिल देण्याचा वाद बेतला जीवावर  वाघोली (ता.हवेली) येथे कटकेवाडी परिसरात एका किरकोळ वादातून कंटेनर चालकाने दुसऱ्या चालकाला थेट कंटेनरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधील बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने राग मनात ठेवून आपला सहकारी चालकाला कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! पतीच्या आत्महत्येने निराशेमध्ये पत्नीने चार वर्षांच्या मुलीसह केली आत्महत्या

घाटणे (ता. माढा): गावातील हरिभाऊ जानू लोंढे (वय ३५) यांनी गुरुवारी (दि. ६) गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूनंतर निराश झालेल्या त्यांच्या पत्नी जनाबाई लोंढे (वय ३२) यांनी ४ वर्षांच्या मुलीसह सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपवल्याने गावात शोककळा पसरली आहे. हरिभाऊ…

Read More
Swarajyatimesnews

पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांना मातृशोक

पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप यांच्या मातोश्री गजराबाई हरिभाऊ जगताप (वय- ९०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.डॉ. शिवाजीराव हरिभाऊ जगताप यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील सामजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. कै.गजराबाई हरिभाऊ जगताप त्यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केलिव आर्थिक मदत

माझी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ३२ लाखांच्या कर्जाची रक्कम कुटुंबियांकडे सुपूर्त देहू – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतीच आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. कर्जाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेला चिठ्ठीत केला होता. ३२ लाखाच्या कर्जाची रक्कम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

शिरुर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना अटक

धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.सुजाता मनोहर बडदे असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अव्वल कारकूनाचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी लाच स्विकारली होती. त्यामुळे खाजगी इसम मारणे व अव्वल कारकून सुजाता बडदे…

Read More
Swarajyatimesneww

कोरेगाव भीमा येथे ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न

ऊसाचे पाचट हे सोन्यासारखे असून त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढवता येते – विकास चव्हाण दिनांक १० फेब्रुवारी  कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामपंचायत कोरेगाव भीमा आणि विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी शेती विषयक विविध विषयांचे…

Read More
Swarajyatimesnews

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणाने पत्नी व मुलांसमोर घेतली झाडाला फाशी 

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात कौटुंबिक वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी घडली. सोहेल येनघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. शनिवारी घरगुती भांडणानंतर सोहेलने पत्नीला घटस्फोटाची धमकी दिली. त्यानंतर पत्नी आणि दोन मुलांसोबत ते शिवाजीनगर…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू

आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…

Read More
error: Content is protected !!