Category: Uncategorized
”पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार’! कोरेगाव भिमा – पेरणे येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटला
कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने १७८३ हेक्टर शेतजमीन,अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तर ग्रामस्थांकडून तातडीने नवीन बंधारा बांधण्याची मागणी दिनांक २० जून २०२५ कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर आणि हवेली तालुक्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या भीमा नदीवरील, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता. हवेली) दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा महत्त्वाचा बंधारा अखेर फुटला आहे!…
संत कान्हुराज महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकडे रवाना
पालखी सोहळ्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष… केंदुर (ता.शिरूर) संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दिमाखाने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘कान्हुराज महाराज की जय’ अशा अखंड जयघोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात, कपाळी गोपीचंद टिळा, गळ्यात टाळ, मुखात नाम आणि डोळ्यांत पंढरीच्या भेटीची असीम ओढ घेऊन हजारो वारकरी भक्तांच्या उत्स्फूर्त…
शिवहर्ष कंद यांची आंतरराष्ट्रीय भरारी, लोणीकंदच्या सुपुत्राचा विदेशात डंका
‘माझं शिक्षण नोकरीसाठी नाही, भारताच्या ग्रामीण भागासाठी व शेती विकासासाठी!’ – हर्ष कंद लोणीकंद (ता.हवेली) -“स्वप्न मोठी पाहा, पण तुमची मुळे कधीही विसरू नका!” – ही प्रेरणा मनात घेऊन शिवहर्ष प्रदीप कंद या ध्येयवेड्या तरुणाने महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतून थेट अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उत्तुंग भरारी घेतली. केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या शिक्षणाच्या जोरावर समाजासाठी काहीतरी भव्य करण्याच्या…
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
आळंदी ( ता. खेड) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी भक्तीचा अनोखा साज चढला आहे! नांदेड येथील निष्ठावान वारकरी, भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आपल्या असीम श्रद्धेचे प्रतीक म्हणून आळंदी मंदिरास तब्बल एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या देदीप्यमान मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून, रामीनवार यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा हा एक…
शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत
“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांसह वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन वारकऱ्यांची पायी वारी सुरु झाली आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वाटचाल करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध…
बायकोसाठी कायपण! मध्य प्रदेशात पतीने पत्नीसाठी बांधलं ताजमहालासारखं घर
मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आवडीनुसार खास ताजमहालसारखं आलिशान घर बांधलं आहे. आनंद प्रकाश चौकसे असं या गृहस्थाचं नाव असून, त्यांनी आपल्या पत्नीसाठी 4BHK घर उभारलं आहे.हे घर पाहताना खरा ताजमहालच समोर आहे असं वाटतं. पांढऱ्या मकराना संगमरवरातून उभारलेलं हे घर आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे, पण सौंदर्य आणि…
सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म
सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म शिरुर तालुक्यातील शिक्रापूरजवळील मलठण फाटा परिसरात सर्पमित्राच्या गाडीतच एक अतिविषारी घोणस जातीचा साप मादी असल्याचे लक्षात येताच मोठा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. या सापाने थेट कारमध्ये ठेवलेल्या बरणीतच तब्बल २७ पिल्लांना जन्म दिला असून, या दुर्मीळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाच्या सरी सुरू असताना…
गौरवास्पद ! मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार अवघ्या ५० हजारात राज्यातील पहिला विवाह सोहळा संपन्न
ना बडेजाव, ना डामडौल ,टोणगे कुटुंबियांनी ५० हजारांत लग्न करून दाखवलं,लग्न म्हणजे खर्च नाही, संस्कार! मराठा समाजाच्या आचारसंहितेने बदलली लग्नाची व्याख्या! पुणे – येथे मराठा समाजाने घालून दिलेल्या आचार संहितेचे पण करत अवघ्या ५० हजारात पार पडलेले राज्यातील हे पहिलेच लग्न असेल. कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांचे चिरंजीव ॲड. प्रफुल्ल व हरिदास पवार…
कोरेगाव भीमा: २५ वर्षांनी भरला स्नेहसंमेलनाचा वर्ग! आठवला बालपणीचा स्वर्ग, बहरला आठवणींचा स्मृतीगंध’!
“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस…
