Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
मुळशी : सकाळी जिममध्ये व्यायाम करताना महाराष्ट्र कुमार केसरी विक्रम पाखले यांचे दुर्दैवी निधन, पुढच्या आठवड्यात होते लग्न..
लाल माती गहिरवली… कुस्ती क्षेत्रावर शोककळा…. मुळशी तालुक्यातील माण गावचा भूमिपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी मल्ल विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) यांचे बुधवारी (ता. ४) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने माण गाव, मुळशी तालुका आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विक्रम यांचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार…
पुण्यात नवऱ्याने हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला लाटण्याने बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव
पत्नीने घेतला करंगळीचा चावा, लाटण्याने मारहाण, मिक्सरचे भांड्यानेही मारहाण करत नखाने ओरबाडले पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.यामुळे भयभीत झालेल्या…
बेघर वृद्धाला दिला मायेचा आधार: सरपंच रमेश गडदे आणि समस्या-उपाय ग्रुपचे माणुसकीचे दर्शन
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसटी स्टँड परिसरात चार-पाच दिवसांपासून भटकणाऱ्या निराधार वृद्धाला शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी आणि सरपंच रमेश गडदे यांनी मायेचा आधार दिला. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत असाहाय्य अवस्थेत असलेल्या या वृद्धाची विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठलाही आधार नसल्याचे समोर आले.यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे व समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाला सणसवाडी येथील माहेर…
व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड
रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient….
श्री क्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठी उत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री मार्तंड मल्हारी देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली. मार्गशीर्ष महिन्यात दिवटी पेटवून कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. सोमवारी (ता. २)सकाळी पाखळणी करण्यात आली. त्यानंतर बालव्दारीमध्ये खंडोबाच्या मूर्तींची स्थापना केली. पानाचे…
दुर्दैवी अंत! २६ व्या वर्षी IPS झाला, नोकरीवर रुजू होण्याच्या दिवशीच प्रवासात गाडीचा टायर फुटल्याने मृत्यू
भयंकर दुर्दैव दुसरे काय असावे, अत्यंत कठोर परिश्रम करत युपीएससी परीक्षा व्हावी, त्यात आय पि एस पोस्ट मिळावी ,ट्रेनिंग पूर्ण होत यावे आणि आनंदाच्या भागात नव्या नोकरीवर रुजू व्हायला प्रवास सुर करावा आणि नियतीने डाव साधावा… अशीच एक हृदयद्रावक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. मध्यप्रदेशातील एक तरुण २६ व्या वर्षी IPS झाला. नोकरीवर रुजू होणार त्याचवेळी…
मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था
पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले. पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…
“वयाच्या सहाव्या वर्षी इंदिरा गांधींच्या निषेधापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत फडणवीस यांची प्रेरणादायी यशोगाथा”
इंदिरा गांधींनी आणीबाणीत वडिलांना तुरुंगात टाकले म्हणून मला त्यांच्या नावाच्या शाळेत शिकायचे नाही असे वयाच्या सहाव्या वर्षी सांगत शाळा बदलणारे, वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २७ व्या वर्षी महापौर, आणि दोन वेळा मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस यांची उत्तुंग वाटचाल महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नेते, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे नाव आज प्रत्येकाच्या…
दौंडमध्ये एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला तर दुसऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीमा नदीचा पट्टा आणि पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. १) पहाटे यवत रेल्वे स्टेशनजवळ एका बिबट्याला रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वन्यजीवांसाठी चिंताजनक असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड,…
भयंकर! घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार
शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला, आरोपी फरार बेलापूरमध्ये एका ९ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. ९ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही…
