Headlines
Swarajyatimesnews

कोंढापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहिम

प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) : कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोंढापुरीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आणि जवळच असलेला पाझर तलाव या परिसरातील…

Read More
Swarajyatimesnews

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत टाळावी – ॲड. प्रिया कोठारी

रांजणगाव गणपती (ता.शिरूर) मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेमध्ये नुकताच विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध ॲड. प्रिया कोठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत यांसारख्या आजच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थी व पालकांना मोलाचा सल्ला दिला. ॲड. प्रिया कोठारी यांनी…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.    या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष  खैरे, केंद्रप्रमुख अनिल पलांडे, केंद्रप्रमुख लंघे, शाळेच्या…

Read More
Swarajyatimesnews

गोरगरिबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – संस्थापक विठ्ठल ढेरंगे

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : परिसरातील शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या अनेक गरजांना साथ देत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे तसेच आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून, मागील ३६ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठल ढेरंगे यांनी केले. संस्थेची ३६ वी वार्षिक सभा चेअरमन नामदेव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More
Swarajyatimesnews

टाकळी हाजीचे सुपूत्र दत्तात्रय चिकटे गुरुजींना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि विद्यार्थीहितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे शिरूर तालुक्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणारे टाकळी हाजी गावचे सुपुत्र  दत्तात्रय अनंतराव चिकटे गुरुजी  यांची “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणे येथे…

Read More
Swarajyatimesnews

सरपंच संदीप ढेरंगे यांच्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीत पोहोचल्याचा अभिमान – उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमाचे (ता. शिरूर) सरपंच संदीप ढेरंगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणासाठी विशेष निमंत्रण मिळाल्याने कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. सरपंच ढेरंगे यांच्या विकासकामांची दखल थेट दिल्लीत घेतली गेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी काढले. या निमंत्रणाबद्दल बोलताना प्रशांत ढोले म्हणाले,…

Read More
Swarajyatimesnews

निलंबित पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई – सेवेतून निलंबित असलेले माजी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (सोमवारी) रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील नागदरा हे मूळ गाव असलेले सुनील नागरगोजे हे अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी पोलिस सेवेत…

Read More
Swarajyatimesnews

मुंबईतील ‘मराठा’ बांधवांना कोरेगाव भीमाचा आधार: लोणचे,चटण्या,बिस्किटे ,पाणी बॉटल्ससह चपात्या पाठवल्या एक हजार

पुणे – मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील अखिल म्हसोबा नगर गणेश मित्र मंडळ, जय जिजाऊ महिला ग्रामसंघ, ढेरंगे वस्ती येथील बांधवांनी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मदतीचा मायेचा हात दिला आहे. आंदोलक बांधवांना जेवण आणि पाणी कमी पडू…

Read More
Swarajyatimesnews

कौशल्य विकास ही उद्योगांची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे – प्रल्हाद वारघडे

पुणे: आजच्या स्पर्धात्मक जगात, केवळ पारंपरिक पदवी शिक्षण पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास (Skill Development) ही सर्वात मोठी गरज बनली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी यशस्वी करिअरचा मार्ग तीन स्तंभांवर आधारित आहे: प्रात्यक्षिक ज्ञान, तांत्रिक प्राविण्य आणि व्यक्तिमत्त्व विकास. उद्योग क्षेत्रातील बदल आणि भविष्यातील रोजगार संधी – तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योग…

Read More
Swarajyatimesnews

माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान

सणसवाडी (ता.शिरूर) येथे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला  व बालकांना अन्नदान करण्यात आले. माजी  आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माजी आमदार अशोक पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक…

Read More
error: Content is protected !!