महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे ५२ वे सरन्यायाधीश

Swarajyatimesnews

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश पदी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.१४ मेला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.

भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला. १९८५ मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बारिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले.गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली केली नंतर ते नागपूरला आले. नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून काम पाहिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर भूषण गवई यांच्या विषयी माहिती आहे त्यामध्ये म्हटले आहे की, ऑगस्ट १९९२ ते जुलै  १९९३या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती होती. जानेवारी २००० मध्ये नागपूर खंडपीठासाठी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आली होती.

१४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती. 12 नोव्हेंबर २००५ रोजी कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

सहा महिन्यांचा कालावधी मिळणार – गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी २४ मे २०१९  मध्ये नियुक्ती झाली होती. आता ते १४  मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. तर २३ नोव्हेंबर २०२५ ला निवृत्त होतील. त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्याचा कार्यकाळ मिळेल.

मुंबईतून कायद्याची पदवी – अमरावती येथून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर गवई यांनी मुंबईतून कायद्याची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावती येथे वकिली केली. १९९० च्या सुमारास त्यांनी नागपुरात निवृत्त न्यायाधीश अधिवक्ता राजा. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश झाले आणि नंतर त्यांना बढती देऊन सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची जबाबदारी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!