Swarajyatimesnews

आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा

वढू बुद्रुक (ता. शिरूर) “सामाजिक कार्य हीच खरी सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी आपला वाढदिवस वंचित आणि उपेक्षित घटकांप्रती कळवळा दाखवत, वढू बुद्रुक येथील माहेर सामाजिक संस्थेत उत्साहात साजरा केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी केवळ एक दिवस नव्हे, तर आयुष्यभर समाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राजकारणी नव्हे, समाजाच्या…

Read More
Swarajyatimesnews

गुंठामंत्री संस्कृती: वैष्णवीचा मृत्यू की सामाजिक नैतिक अधःपतन?

गुंठामंत्री संस्कृती’ हा शब्द आज केवळ जमिनीच्या मोजमापापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या समाजातील संवेदनशीलता, माणुसकी आणि मूल्यांच्या घसरणीचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी कुटुंबाला आधार देणारी, नात्यांना महत्त्व देणारी समाज रचना आज झगमगाटाच्या दुनियेत हरवून गेली आहे. अचानक आलेल्या श्रीमंतीने भौतिक सुखांचा ढीग दिला असला, तरी नात्यांमध्ये मात्र काळोख साठू लागला आहे. उद्योगनगरी ते…

Read More
Swarajyatimesnews

दुर्दैवी! चाकणच्या कडाचीवाडी येथे पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

चाकण (ता.खेड) कडाचीवाडी येथे सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुले घरी आली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. यावेळी पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने चिंता वाढली, स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेण्यात आला आणि चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.  दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी (ता.खेड ) येथील पाझर…

Read More
Swarajyatimesnews

JSPM च्या विद्यार्थ्यांनी AI वर आधारित शेतीसाठी बनवले क्रांतिकारी अ‍ॅप

अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत मिळणार माहिती पुणे – जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (BSIOTR), वाघोली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी AI-ML आधारित अ‍ॅप तयार केले आहे. श्रीहर्ष देशमुख, अमन कुमार, अनिश बनसोडे आणि प्रितेश बिरादार यांनी तयार…

Read More
Swarajyatimesnews

महावितरणला पावसाचा फटका; ९२४ वीज खांब पडले

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर २७ मे  – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे. पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव…

Read More
Swarajyatimesnews

माता रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी देणार उजाळा

पुणे, २७ मे २०२५ – महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणींचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर “रमाई संशोधन प्रकल्पा”द्वारे बार्टी संस्था प्रकाश टाकणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे येथे रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील पूल गेला वाहून.. घर, गोठ्यामध्ये शिरले पाणी..शेतीचेही नुकसान 

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून.. कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम…

Read More
Swarajyatimesnews

थेऊर फाटा येथे अपघातात माळकऱ्याचा मृत्यू; पिशवीत सापडले 2.40 लाख रुपये

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा येथे बुधवारी (ता. 21) पहाटे एका अनोळखी माळकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तो रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत बँक ऑफ बडोदा समोर घडली. मृत व्यक्ती लोणी काळभोर परिसरात नागरिकांकडून भिक्षा मागत असल्याचे सांगण्यात येते.घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.  या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

Read More
Swarajyatimesnews

लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…

Read More
error: Content is protected !!