Swarajyatimesnews

आता पैशांमुळे कोणाचेही शिक्षण थांबणार नाही: ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी’ योजनेद्वारे घरबसल्या मिळवा बिनव्याजी कर्ज!

योजनेमुळे घरबसल्या, कुठल्याही हमीदाराशिवाय आणि मालमत्ता गहाण न ठेवता शैक्षणिक कर्ज मिळवता येते बँकेच्या फेऱ्या नाहीत, थेट पोर्टलवर अर्ज!  चांगले शिक्षण मिळावे आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आता ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ (PM VidyaLakshmi Yojana) सुरू केली…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्याची ‘कारभारीण’ – आधुनिक महाराष्ट्राची खरी हिरोईन!

शेतकऱ्याची कारभारीण: संस्कृती, समर्पण, स्वावलंबन आणि स्त्रीशक्तीचा गौरव! मातीत जन्मलेली, संस्कृतीने घडलेली, कुटुंबाला आधार देणारी, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा मार्ग घडवणारी – ही आहे शेतकऱ्याची ‘कारभारीण’. शहरी झगमगाटात हरवून न जाता, आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडून, स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने एक नवा आदर्श निर्माण करणारी ही शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खऱ्या अर्थाने असामान्य स्त्रीशक्तीचे प्रतीक! ती…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यातील शेतकरी पुत्र प्रथमेश मलगुंडेची पहिल्याच प्रयत्नात ‘इंडियन नेव्ही’त सब लेफ्टनंट पदी निवड

ढोक सांगवी (ता.शिरूर) येथील शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण शाळेतून मिळालेले शिक्षण आणि मनात देशसेवेची जिद्द आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचाराची प्रेरणा या त्रिसूत्रीच्या बळावर शिरूर तालुक्याच्या प्रथमेश मलगुंडेने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलात (Indian Navy) ‘सब लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे! हे यश केवळ प्रथमेशचे नाही, तर ग्रामीण भागातील संघर्ष करत स्वतःल सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक…

Read More
Swarajyatimesnews

बायकोसाठी कायपण! मध्य प्रदेशात पतीने पत्नीसाठी बांधलं ताजमहालासारखं घर

मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आवडीनुसार खास ताजमहालसारखं आलिशान घर बांधलं आहे. आनंद प्रकाश चौकसे असं या गृहस्थाचं नाव असून, त्यांनी आपल्या पत्नीसाठी 4BHK घर उभारलं आहे.हे घर पाहताना खरा ताजमहालच समोर आहे असं वाटतं. पांढऱ्या मकराना संगमरवरातून उभारलेलं हे घर आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे, पण सौंदर्य आणि…

Read More
Swarajyatimesnews

Air India Flight Crash: लंडनला निघालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा ३ मुलांसह करून अंत

महिनाभरापूर्वीच सिलेक्शन, स्वप्न अधुरे राहिले! अहमदाबाद,: १३ जून २०२५– अवघ्या महिन्याभरापूर्वीच लंडनमधील हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या डॉ. प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. कौनी व्यास तसेच त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांचा अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी (१२ जून २०२५ रोजी) झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे या कुटुंबाचे स्वप्न होते, मात्र…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा: २५ वर्षांनी भरला स्नेहसंमेलनाचा वर्ग! आठवला बालपणीचा स्वर्ग, बहरला आठवणींचा स्मृतीगंध’!

“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीतील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षेचे पेपर रात्री लिहिण्यास देणाऱ्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक

दोन लाख रुपयांसह महत्त्वाचा मुद्देमाल जप्त; ८ विद्यार्थ्यांचीही ओळख पटली पुण्यातील वाघोली येथे असलेल्या पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परिक्षेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कॉलेजमध्ये दिवसा झालेला परिक्षेचा पेपर रात्री उशिरा पुन्हा लिहून घेतला जात होता. पुणे गुन्हे शाखेने छापा टाकून कॉलेजच्या एका प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये…

Read More
Swarajyatimesnews

गुंठामंत्री संस्कृती: वैष्णवीचा मृत्यू की सामाजिक नैतिक अधःपतन?

गुंठामंत्री संस्कृती’ हा शब्द आज केवळ जमिनीच्या मोजमापापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या समाजातील संवेदनशीलता, माणुसकी आणि मूल्यांच्या घसरणीचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी कुटुंबाला आधार देणारी, नात्यांना महत्त्व देणारी समाज रचना आज झगमगाटाच्या दुनियेत हरवून गेली आहे. अचानक आलेल्या श्रीमंतीने भौतिक सुखांचा ढीग दिला असला, तरी नात्यांमध्ये मात्र काळोख साठू लागला आहे. उद्योगनगरी ते…

Read More
Swarajyatimesnews

JSPM च्या विद्यार्थ्यांनी AI वर आधारित शेतीसाठी बनवले क्रांतिकारी अ‍ॅप

अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत मिळणार माहिती पुणे – जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (BSIOTR), वाघोली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी AI-ML आधारित अ‍ॅप तयार केले आहे. श्रीहर्ष देशमुख, अमन कुमार, अनिश बनसोडे आणि प्रितेश बिरादार यांनी तयार…

Read More
Swarajyatimesnews

महावितरणला पावसाचा फटका; ९२४ वीज खांब पडले

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर २७ मे  – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे. पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव…

Read More
error: Content is protected !!