Swarajyatimesnews

धक्कादायक ! शाळकरी मित्रानेच केला मित्राचा खून; प्रेत सोयाबीनच्या गुळीत पुरले

औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी…

Read More
Swarajyatimesnews

मुंबईत रात्रीची वेळ , शिरूर तालुक्यातील मुलींच्या समोर मोठ्या अडचणी… आणि भावासारखे मदतीसाठी रात्री धावले प्रदीप कंद 

पोलीस भरतीसाठी गेलेल्या मुलींसाठी अर्ध्यारात्री धावून जात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रदीप कंदांच्या सहृदयतेचे व माणुसकीचे होतेय कौतुक मुंबई सारखे अनोळखी आणि मोठे शहर त्या शिरूर तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागातील  सर्वसामान्य कुटुंबातील १० ते १२  मुली रात्री मुंबईसारख्या शहरात पोलीस भरतीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा पोहोचल्यानंतर त्यांना राहण्याच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी…

Read More
Swarajyatimesnews

पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी, पुढच्या महिन्यात होती निवृत्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरे अपत्य असल्यामुळे आणि लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली.   दांगट यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंब नियमांनुसार, महापालिकेच्या पदांवर नियुक्तीसाठी दोन अपत्यांपर्यंतची अट आहे….

Read More
Swarajyatimesnews

धेय्य साध्य करा, सत्कर्म करा, समाजहिताची सांगड घालत आयुष्य आनंदी बनवा – व्यवस्थापक सुरेश साळुंखे

वाडेगाव येथील भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला उत्साहात सुरुवात वाडेगाव (ता. हवेली): प्रत्येकाने सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी सत्कर्म करणे अत्यावश्यक आहे, कारण कर्म फिरून आपल्याकडेच परत येते. सत्कर्म आणि समाजहिताची सांगड घालून जीवन अधिक सुखी करता येते, असे प्रेरणादायी विचार भारतीय जैन संघटनेचे प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके यांनी मांडले. वाडेगाव येथे…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरचे भूमिपुत्र उद्योजक दिपक भिवरे ”आदर्श उद्योगपती कै. अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट उद्योजक २०२४’ पुरस्काराने सन्मानित  

सुंदरबाई पवार गौरव पुरस्कार सोहळ्यात शिरूर विविध मान्यवरांचा सन्मान जातेगाव (ता. शिरूर)”ग्रामीण भागातील माता-भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कायमस्वरूपी उतरवून त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचवणे हाच माझा सेवा धर्म आहे,” असे ‘आदर्श उद्योगपती कै. अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट उद्योजक २०२४’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले आदर्श उद्योजक दिपक जयसिंग भिवरे यांनी व्यक्त केले.  माजी मंत्री व आमदार…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीची स्नेहल हिरे बनली (सी.ए.) सनदी लेखापाल

सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्नेहल अरुण हिरे हिने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. स्नेहलने अत्यंत मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्नेहल ही लहानपणापासून अभ्यासात प्राविण्य मिळवणारी…

Read More
Searajyatimesnews

फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…

Read More
Swarajyatimesnews

पुण्याच्या प्रशासनात डुडी कुटुंबाचा तिहेरी कार्यभार! जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी, पत्नी आय.पि. एस, मेहुणा पिंपरी चिंचवड आयुक्त 

एकाच कुटुंबातील तीन अधिकारी सांभाळणार पुण्याचा कार्यभार  राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील…

Read More
Swarajyatimesnews

माणुसकी जपणारे अधिकारी, अभिवादनासाठी आलेल्या  भीम अनुयायांना दिले मोफत चहा,नाष्टा व भोजन सेवा

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी आले होते यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत, कर्तव्यावर असताना माणुसकी जपत आलेल्या भीम अनुयायांच्या चहा ,नाष्टा व भोजनाची उत्तम सुविधा करत कर्तव्य व माणुसकी एकच वेळी जपल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे अनुयायांनी आभार मानले.    कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील लाखोंच्या संख्येने…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे.मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

Read More
error: Content is protected !!