
ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन
अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…