माझ्या नावावर पावत्या कशाला फाडतो? घोडगंगा साखर कारखान्यावरून अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं

स्वराज्य टाईम्स न्यूज

लोणी काळभोर (ता. हवेली) येथे शिरूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवारांवर निशाणा साधला. घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याच्या प्रकरणावरून अजित पवारांनी अशोक पवारांना खडेबोल सुनावले. “माझ्या नावावर पावत्या का फाडतोस? भावकीचा फायदा घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न का करतो आहेस?” अशा स्पष्ट शब्दांत अजित पवारांनी अशोक पवारांना खडे बोल लोणी काळभोर (ता.हवेली) येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले.

भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचे म्हणत मला बदनाम का करतो आहे. हाच बाबा चालु असल्याने चालु कारखाना मुलाच्या ताब्यात न देता बंद पडलेला. मुलाकडे दिला आणि कारखाना बंद पाडायचा होता. पण तुझ्यावर कृपा दाखवली, तर तू कारखाना बंद पाडला आणि मला आता बदनाम करतोय.

यापुर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावलं आहे.मला जर कारखाना बंद पडायचा असता तर मी व्यंकटेश कारखाना अगोदर बंद पडला असता.यापूर्वी दादा-दादा करत होता. अजितदादासारखा माणूस नाही, असे सगळ्यांना सांगत होता. मग आता काय झाले? असे म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवारांना थेट सुनावले. विधानसभा निवडणुकीत ज्ञानेश्वर माऊली कटके यांना बहुमतांनी निवडून द्या, शिरूरचा विकास काय असतो ते दाखवून देईन, असे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केले.

शिरूर विधानसभेत शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात लढत होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माऊली कटके तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अशोक पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकास एक होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!