Swarajyatimesnews

वाघोलीत माझ्या घरी का राहतेस, म्हणून जावयाकडून सासूला मारहाण तर मेव्हुणीवर चाकू हल्ला..

वाघोली (ता. हवेली) येथे सासूला घरातून निघून जाण्याची धमकी देत जावयाने मारहाण केली आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हणीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पुष्पा वामन शेलार (वय ६५, रा. वाघोली, केसनंद रोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९, रा. वाघोली, केसनंद रोड) याच्यावर…

Read More
Searajyatimesnews

बांधकाम विभागाच्या निषेधार्थ पिंपळे जगताप ग्रामस्थ आक्रमक, रस्ता रोको करत तीव्र निषेध, एका महिन्यात चार बळी 

गावची जत्रा रद्द करण्याचा निर्णय, ग्रामस्थ खेडकर कुटुंबाला घरटी करणार आर्थिक मदत शिक्रापूर : चाकण – शिक्रापूर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या  पिता आणि पुत्राचा अपघातात जागेवर मृत्यू झाला होता.  या घटनेमुळे पिंपळे जगताप गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत शोकसभा घेऊन बांधकाम विभागाचा तीव्र निषेध व्यक्त केला.पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील कालच्या खेडकर परिवारातील तिघांसह…

Read More
Swarajyatimesnews

पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी, पुढच्या महिन्यात होती निवृत्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरे अपत्य असल्यामुळे आणि लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली.   दांगट यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंब नियमांनुसार, महापालिकेच्या पदांवर नियुक्तीसाठी दोन अपत्यांपर्यंतची अट आहे….

Read More
Swarajyatimesnews

नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; पतीने घेतला गळफास,पत्नी व प्रियकर अटकेत

देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे ३० वर्षीय रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड याने २८ डिसेंबर २०२४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपासात पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.   रमेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये पत्नी ताराबाई हिचे रवी गांगड याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा…

Read More
Swarajyatimesnews

धेय्य साध्य करा, सत्कर्म करा, समाजहिताची सांगड घालत आयुष्य आनंदी बनवा – व्यवस्थापक सुरेश साळुंखे

वाडेगाव येथील भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला उत्साहात सुरुवात वाडेगाव (ता. हवेली): प्रत्येकाने सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी सत्कर्म करणे अत्यावश्यक आहे, कारण कर्म फिरून आपल्याकडेच परत येते. सत्कर्म आणि समाजहिताची सांगड घालून जीवन अधिक सुखी करता येते, असे प्रेरणादायी विचार भारतीय जैन संघटनेचे प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके यांनी मांडले. वाडेगाव येथे…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरचे भूमिपुत्र उद्योजक दिपक भिवरे ”आदर्श उद्योगपती कै. अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट उद्योजक २०२४’ पुरस्काराने सन्मानित  

सुंदरबाई पवार गौरव पुरस्कार सोहळ्यात शिरूर विविध मान्यवरांचा सन्मान जातेगाव (ता. शिरूर)”ग्रामीण भागातील माता-भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कायमस्वरूपी उतरवून त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचवणे हाच माझा सेवा धर्म आहे,” असे ‘आदर्श उद्योगपती कै. अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट उद्योजक २०२४’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले आदर्श उद्योजक दिपक जयसिंग भिवरे यांनी व्यक्त केले.  माजी मंत्री व आमदार…

Read More
Searajyatimesnews

पिंपळे जगतापमध्ये हृदय पिळवटणारी घटना: मद्यधुंद ट्रक चालकाने बापासह दोन चिमुकल्यांना चिरडले

शिक्रापूर येथे धक्कादायक व दुःखद तसेच हृदयाला पिळवटून टाकणारी एक घटना घडली असून या घटनेनं अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असून आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला मद्यधुंद ट्रक चालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.(A shocking, sad and heartbreaking incident has taken place in Shikrapur, which has…

Read More
Swarajyatimesnews

देवाच्या आळंदीत वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण; आरोपीला अटक

पुणे – आळंदीच्या मरकळ चौकात शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर (वय ५४) यांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. गाडीवर दंड आकारल्याचा राग मनात ठेवून विजय नामदेव जरे (वय ३३, रा. गोपाळपुरा, आळंदी) या व्यक्तीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जरे याने वाडेकर यांना गाडीवर पावती का केली, असा…

Read More
Swarajyatimesnews

‘सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’. हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही  प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – दि.४ जानेवारी सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेठ गोकुळदास तेजपाल नाट्यगृहात चाणक्य या नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला हजेरी लावली. या प्रसंगी बोलताना…

Read More
Swarajyatimesnews

DYSP पोलिस अधिकाऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य

बेंगलोर – मधुगिरी येथे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्याकडे एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी  रामचंद्रप्पा महिलेला  केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित…

Read More
error: Content is protected !!
en_USEnglish