Swarajyatimesnews

सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम

२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…

Read More
Swarajyatimesnews

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

Read More
Swarajyatimesnews

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे  महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

Read More
Swarajyatimesnews

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त

पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…

Read More
Swarajya Times news

धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेत आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत कार्यरत असलेले रवींद्र महाले यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मधली सुट्टी संपल्यानंतर रवींद्र महाले यांना गळफास…

Read More
Swarajyatimesnews

आता पैशांमुळे कोणाचेही शिक्षण थांबणार नाही: ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी’ योजनेद्वारे घरबसल्या मिळवा बिनव्याजी कर्ज!

योजनेमुळे घरबसल्या, कुठल्याही हमीदाराशिवाय आणि मालमत्ता गहाण न ठेवता शैक्षणिक कर्ज मिळवता येते बँकेच्या फेऱ्या नाहीत, थेट पोर्टलवर अर्ज!  चांगले शिक्षण मिळावे आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आता ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ (PM VidyaLakshmi Yojana) सुरू केली…

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्याची ‘कारभारीण’ – आधुनिक महाराष्ट्राची खरी हिरोईन!

शेतकऱ्याची कारभारीण: संस्कृती, समर्पण, स्वावलंबन आणि स्त्रीशक्तीचा गौरव! मातीत जन्मलेली, संस्कृतीने घडलेली, कुटुंबाला आधार देणारी, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा मार्ग घडवणारी – ही आहे शेतकऱ्याची ‘कारभारीण’. शहरी झगमगाटात हरवून न जाता, आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडून, स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने एक नवा आदर्श निर्माण करणारी ही शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खऱ्या अर्थाने असामान्य स्त्रीशक्तीचे प्रतीक! ती…

Read More
Swarajyatimesnews

पुणे: वाघोलीच्या मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर १० वर्षांची बंदीची शिफारस; उत्तरपत्रिका गैरप्रकार प्रकरण

पुणे: वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये परीक्षा गैरप्रकाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहिल्याचा गंभीर आरोप या कॉलेजवर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉलेजवर १० वर्षांसाठी परीक्षा केंद्र बंद ठेवण्यासह कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या घटनेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टराची तणावातूनच आत्महत्या…

मानसोपचार तज्ज्ञाच्या मृत्यूने खळबळ.. अकोला: जे डॉक्टर लोकांना तणावातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर झटले, त्याच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी स्वतःच तणावातून बाहेर न पडता विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. त्यांच्या या मृत्यूने केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यातील सन्मित्र…

Read More
error: Content is protected !!